अग्निशमन दलाची तत्परता; नुकसानग्रस्त शेतकऱ्याची हाक कोण ऐकणार?
राजुरा | Rajura Farm Fire: तालुक्यातील बामणी गावचे शेतकरी श्री. भाऊराव रमेश शेंडे यांच्यावर आभाळ फाटून कोसळले. उडान पुलियाच्या बाजूला असलेल्या त्यांच्या शेतातील कोट्यावर अचानक वीज कोसळली आणि भीषण आग लागून संपूर्ण शेती उपयोगी अवजारे भस्मसात झाली. या घटनेने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, शासकीय यंत्रणांच्या उदासीनतेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
२२ मे गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. Rajura Farm Fire विजेच्या एका प्रचंड झटक्याने शेंडे यांच्या शेतातील कोट्यावर ठेवलेल्या सर्व साहित्यांनी पेट घेतली. यात दोन डवरे, दोन वांगोडा, दोन वकर, दोन नागर, सहा जूव, दोन चार्जिंग पंप, दोन हँड पेट्रोल पंप, खताच्या दोन चुंगळ्या, बैलांचा चारा आणि अन्य शेतीसाठी अत्यंत आवश्यक असलेलं सर्व साहित्याची काही क्षणांतच राखरांगोळी झालं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, शेतकरी शेंडे यांचे लाखो रुपयांचे साहित्य सरकारच्या कोणत्याही आपत्ती नोंदणी यादीत नव्हते. Rajura Farm Fire आजही विद्युत अपघातामुळे होणाऱ्या आगीनंतरच्या नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्याला जिल्हा अधिकाऱ्यांच्या दारात हेलपाटे घालावे लागते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
अग्निशमन दल तत्पर, पण यंत्रणा मात्र ढिसाळ
ही आग लागल्याची माहिती मिळताच राजुरा अग्निशमन दलाने प्रसंगावधान राखत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
यामध्ये फायरमन राजदीप येलपुले, आसिफ शेख, राहुल रतनकर (Rahul Ratankar) आणि चालक बुद्धेश्वर धोंगळे यांनी प्रसंगावधान राखून आग विझवली. Rajura Farm Fire या कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. Rajura Farm Fire पण प्रश्न असा आहे की, जर ही आग शेजारील शेतात पसरली असती तर प्रशासन किती वेळात पोहोचलं असतं?
शेतकऱ्याचे आक्रंदन — "मी आता कुठं जावं?"
शेतकरी भाऊराव शेंडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं,
❝ हे सर्व साहित्य वर्षानुवर्ष मेहनत करून जमवलं होतं. आता सगळं जळून खाक झालंय. माझं पुढचं पीक कसं करायचं? खतं, औजारे, पंप – काहीच उरलेलं नाही. मी आता कुठं जावं? ❞
या आगीत जळून खाक झालेलं साहित्य संपूर्ण शेती यंत्रणेचं एक अविभाज्य अंग होतं. यापुढे शेतीसाठी त्यांना पुन्हा सगळं नव्याने विकत घ्यावं लागणार आहे, ज्याची अंदाजे किंमत किमान १.५ ते २ लाख रुपये इतकी आहे.
प्रशासन का गप्प?
हा प्रश्न केवळ एका शेतकऱ्याच्या आयुष्याचा नसून संपूर्ण यंत्रणेच्या अपयशाचं मूर्त रूप आहे.
विद्युत खात्याच्या हलगर्जीमुळे ही वीज शेतात कोसळली, पण विद्युत निरीक्षक, महसूल विभाग किंवा तहसील कार्यालय याकडे कोणतंही रीतसर पंचनामं करण्यासाठी अद्याप गेलेलं नाही. ही सर्व यंत्रणाच झोपेत आहे का?
या घटनेनंतर ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी ताबडतोब पंचनामा करायला हवा होता, पण आत्तापर्यंत कोणतंही लिखित पत्र न मिळाल्याचं स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात आलं. Rajura Farm Fire ही अप्रामाणिक वागणूक म्हणजेच एका शेतकऱ्याच्या आयुष्याला गालबोट लावण्याचा जणू सरकारी कटच आहे, असं चित्र दिसत आहे.
शासनाच्या जबाबदाऱ्या कोण पार पाडणार?
- महसूल विभाग – नुकसान झालेल्या शेतकऱ्याला तत्काळ मदतीचा निधी मंजूर करायला हवा.
- विद्युत वितरण कंपनी (MSEDCL) – अशा घटनांबाबत पूर्वसूचना देणं, आपत्तीचे निदान करणं, आणि संरक्षक उपाय करणे ही त्यांची जबाबदारी आहे.
- कृषी विभाग – पीक विमा व यंत्रसामग्रीच्या नुकसानीसाठी स्वतंत्र मदत योजना लागू आहे का? असल्यास का लागू केली जात नाही?
- तहसीलदार व जिल्हाधिकारी – त्यांनी त्वरित दखल घेऊन यंत्रणा हलवली पाहिजे.
राजकारणी कुठं आहेत?
दरवेळी फोटोसाठी शेतकऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवणारे, नवसाला ११ बकरे कापणारे, सायकलीने शेतशिवारावर पोहणारे नेते आणि लोकप्रतिनिधी आज गप्प का आहेत? भाऊराव शेंडेसारखा (Bhaurao Ramesh Shende) शेतकरी जेव्हा अक्षरशः उद्ध्वस्त झालाय, तेव्हा त्याला आधार द्यायला कोणी पुढं का येत नाही?
केवळ निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी शेतकऱ्यांचं खोटं हित जपणारे लोकप्रतिनिधी आज कुठं लपलेत? जर हा शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडला असता, तरच का शासन जागं झालं असतं?
लोकशाहीमध्ये शेतकऱ्याची किंमत आहे का?
या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, शेतकऱ्याच्या जीवाची किंमत सरकारसाठी शून्य आहे. योजनांच्या नावाखाली हजारो कोटींचं राजकारण केलं जातं, पण प्रत्यक्षात एक शेतकरी संकटात आला की त्याला “प्रक्रिया सुरु आहे” असं उत्तर मिळतं.
मागण्या काय?
सरकारच्या निधीची आणि योजनेची जाहिरात करणारे होर्डिंग्ज लावणाऱ्या यंत्रणेला खरंच ‘शेतकऱ्याचं हित’ कधी समजेल?
की इतकं नुकसान झाल्यानंतरही 'काही झालेलं नाही' असंच प्रशासनाचं ब्रीद वाक्य राहणार आहे?
शेतकरी विचारतोय, "मी फक्त मरण पावल्यावरच तुम्हाला जाग येणार का?"
What caused the fire in Rajura farmer Bhau Shende’s field?
What was damaged in the fire?
Has the government offered any compensation or aid?
What action has the fire department taken?
#RajuraFarmFire #Rajura #FarmFire #FarmerCrisis #LightningStrike #AgriculturalLoss #MaharashtraNews #RuralNeglect #ShivVidutVibhag #FireAccident #BamniVillage #FarmerRights #CompensationDemand #AgricultureDamage #FireDepartment #DisasterRelief #FarmEquipmentLoss #NegligentAdministration #RuralNews #GroundReport #ShetiVibhag #VidutKompani #Mahawani #MahawaniNews #RajuraTehsil #DistrictCollector #FarmerSupport #ShetiHakka #ElectricityNegligence #PanchanamaDelay #ShasanVirodhi #GrassrootsIssues #KisanSamasya #FarmingCrisis #RuralDisaster #ShetiSahitya #AgroCrisis #GovernmentFailure #UrgentRelief #RajuraUpdates #AgroDamage #AgrarianDistress #EmergencyRelief #KisanMorcha #JababdariKoniGhenar #ShetiVinaash #GroundZero #ZillaAdhikari #TehsildarMissing #FireRescue #KisanVoice #ShasanGhumashya #RajuraNews #Veer_Punekar_News