Rajura-Asifabad Road Crisis | राजुरा-आसिफाबाद मार्गावरील रेल्वे गेट व अपूर्ण रस्त्यांचे संकट

Mahawani
0

Photo of potholes on the road

दीर्घकाळ दुर्लक्षित पायाभूत सुविधा ठरतंय नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा

Rajura-Asifabad Road Crisis | राजुरा | आसिफाबाद-राजुरा मार्गावरील रेल्वे गेट हा अनेक वर्षांपासून नागरिकांच्या रोषाचा विषय ठरलेला आहे. गेटवरील सततचे थांबे, वाहतुकीचा ठप्प प्रवाह आणि प्रशासनाचे ठळक दुर्लक्ष यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाला दैनंदिन त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याच मार्गावर चालू असलेले रस्त्याचे अर्धवट काम परिस्थिती आणखी भीषण बनवत आहे. अपघात, विलंब आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या संयमाचा अंत होत चालला असून, प्रशासनाविरोधात असंतोष तीव्र होत आहे.

Rajura-Asifabad Road Crisis

विद्यार्थ्यांचा मनस्ताप आणि शैक्षणिक नुकसान

राजुरामध्ये शिक्षणासाठी दररोज हजारो विद्यार्थी ये-जा करतात. शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिवाजी महाविद्यालय, आदर्श हायस्कूल, न्यू एरा इंग्लिश हायस्कूल यांसारख्या शिक्षणसंस्थांकडे जाण्यासाठी रेल्वे गेट हा प्रमुख मार्ग ठरतो. वरूर रोड, विरुर स्टेशन, लक्कडकोट, देवाडा, सोंडो, लाठी अशा ग्रामीण भागांतून विद्यार्थी रोज राजुराकडे प्रवास करतात.

Rajura-Asifabad Road Crisis

रेल्वे गेटवर अर्धा-एक तास थांबून राहावे लागणे हे त्यांचे दैनंदिन वास्तव झाले आहे. उशिरामुळे वर्ग चुकणे, अभ्यासाचा ताण वाढणे, परीक्षांच्या काळात गेटवर अडकून पडल्याने प्रश्नपत्रिका सोडण्याची वेळ येणे – ही दुर्दशा वारंवार अनुभवावी लागते. विद्यार्थ्यांचा मनस्ताप केवळ शैक्षणिकच नव्हे, तर मानसिक पातळीवरही हानिकारक ठरत आहे.

Rajura-Asifabad Road Crisis

जड वाहतुकीची वर्दळ, दयनीय रस्त्यांची अवस्था

या मार्गावर सतत अवजड वाहने धावत असतात. कोळसा, लाकूड, बांधकाम साहित्य आणि औद्योगिक माल वाहून नेणाऱ्या ट्रकांच्या सततच्या वर्दळीमुळे रस्त्यांची वाटोळे झाले आहे. खड्ड्यांनी व्यापलेले रस्ते, पावसाळ्यातील चिखल आणि उन्हाळ्यातील प्रचंड धूळ यामुळे प्रवास एक प्रकारचा जीवघेणा अनुभव ठरतो.

Rajura-Asifabad Road Crisis

वाहनचालकांसाठी अपघाताचा धोका नेहमीच डोक्यावर असतो. खराब रस्त्यांमुळे ट्रॅफिक अनेकदा एक-एक तास ठप्प होते. परिणामी विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून रुग्णांपर्यंत प्रत्येकाचा प्रवास विलंबित होतो. अपघातग्रस्तांना ॲम्ब्युलन्स वेळेवर पोहोचत नाही, यामुळे जीवितहानी वाढते.

Rajura-Asifabad Road Crisis

अपघातांची मालिकाच सुरू

या मार्गाच्या दुरवस्थेने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. ३० जुलै रोजी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर याआधीही अनेकांना अपघाताचा बळी द्यावा लागला आहे. “रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे, हेच कळत नाही,” असे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. प्रशासनाने केलेल्या निष्क्रियतेवर स्थानिक संताप व्यक्त करत आहेत.

Rajura-Asifabad Road Crisis

सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज

राजुरा-आसिफाबाद मार्गावरील रस्त्याचे काम जीआर कन्स्ट्रक्शनने वेळेत पूर्ण केलेले नाही. त्यामुळे प्रवाश्यांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना व रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ – या दुहेरी संकटाने जनतेचे आयुष्य हैराण झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे,
— विशाल शेंडे, सामाजिक कार्यकर्ते

Rajura-Asifabad Road Crisis

या मार्गावर सतत अवजड वाहनांची वर्दळ असते. रस्त्याचे काम कासव गतीने सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ट्रॅफिक तासन्‌तास बंद राहते, ॲम्ब्युलन्स वेळेवर पोहोचत नाही. हा नागरिकांवर अत्याचार आहे. प्रशासनाने तत्काळ काम पूर्ण करून सामान्यांना दिलासा द्यावा.
— स्वप्नील जीवतोडे, सामाजिक कार्यकर्ते, वरूर (रोड)

Rajura-Asifabad Road Crisis

प्रशासनाचे ठळक दुर्लक्ष

सदर विषयावर आजी-माजी आमदारांकडून देखील सततचे दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनी तक्रारी, अर्ज, निवेदने दिली. तरीही रेल्वे गेटवरील समस्येकडे वा रस्त्याच्या दर्जाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे, मात्र आजही प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत.

Rajura-Asifabad Road Crisis

प्रशासनाने वेळेवर कारवाई केली असती, तर इतक्या अपघातांचे बळी वाचले असते, असा रोष नागरिकांत आहे. ठेकेदार कंपनीकडून कामात ढिलाई झाली तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. यामुळे जनतेच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणीही स्वीकारत नाही, अशी नागरिकांची खंत आहे.

Rajura-Asifabad Road Crisis

तोडगा कधी?

राजुरा-आसिफाबाद मार्गावरील रेल्वे गेट आणि अपूर्ण रस्ते हे केवळ गैरसोयीचे प्रश्न नाहीत, तर थेट नागरिकांच्या जीविताशी संबंधित गंभीर मुद्दे आहेत. विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण, व्यापारी आणि प्रवासी – प्रत्येकाला या दुरवस्थेचे भोगावे लागत आहे. अपघातांचे वाढते प्रमाण, वेळेचा अपव्यय आणि प्रदूषणाचा ताण या सर्वांचा परिणाम नागरिकांच्या आयुष्यावर होत आहे.

Rajura-Asifabad Road Crisis

प्रशासनाने तातडीने पावले उचलून रेल्वे गेटवरील समस्या सोडवावी, रस्त्याचे काम जलद गतीने व दर्जेदाररित्या पूर्ण करावे, ही जनतेची एकमुखी मागणी आहे. अन्यथा लोकांचा संताप रस्त्यावर उतरेल आणि प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन अपरिहार्य ठरेल, हे निश्चित.


What is the main issue on the Rajura-Asifabad route?
The main issue is the poorly maintained road and the problematic railway gate, causing traffic delays, accidents, and daily inconvenience.
How are students affected by this problem?
Students face long waits at the railway gate, delays in reaching schools and colleges, and even risk missing exams due to traffic disruptions.
Why are accidents frequent on this road?
Frequent accidents occur due to incomplete road construction, heavy vehicle movement, deep potholes, and lack of timely repairs.
What are citizens demanding from the administration?
Citizens demand immediate completion of roadwork, better quality construction, and permanent solutions to the railway gate delays.


#Rajura #Asifabad #RoadCrisis #RailwayGateIssue #StudentProblems #PublicAnger #InfrastructureFailure #HighwayDelay #AccidentZone #TrafficJam #CitizenSafety #RajuraNews #AsifabadUpdates #MaharashtraNews #RoadAccidents #HighwayTrouble #GovernmentNegligence #StudentSuffering #FarmersVoice #PublicProtest #LocalVoices #RajuraUpdates #RoadWorkDelay #HighwayIssues #CivicCrisis #RajuraAsifabad #TransportChaos #DustPollution #RainySeasonTrouble #RoadSafety #CivicNegligence #RajuraPeople #DailyStruggle #InfrastructureCrisis #RajuraHighway #PublicDemand #GovtActionNeeded #RajuraAsifabadHighway #RajuraRailwayGate #RajuraYouth #RajuraFarmers #RajuraStudents #RoadDevelopment #NHWorkDelay #RajuraAccidents #ChandrapurNews #CitizenVoices #HighwayConstruction #RajuraUpdatesNow #RajuraMovement #RajuraNews #PratikshaWasnikNews #VeerPunekarReport #ChandrapurNews #RajuraRoadNews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top