Buddha Jayanti Violence: बौद्धविहारात ध्वजारोहना ऐवजी दगडफेक

Mahawani
9 minute read
0


समाजकंटकांचा हिंसाचार, पोलिसांचा अन्याय, प्रशासनाचा दुहेरी चेहरा उघड

राजुरा | तालुक्यातील भेदोडा गावात बुद्धजयंतीच्या दिवशी, जिथे संयम, शांतता आणि समता यांचे मूल्य अंगीकारले जाते, तिथेच बौद्धविहाराच्या परिसरात उघडपणे हिंसाचार घडवून आणण्यात आला. Buddha Jayanti Violence हा केवळ वाद नव्हता, तर समाजावर राबवलेला योजनाबद्ध हल्ला होता — ज्यात समाजकंटकांनी दगडफेक, खुर्च्यांचा मारा, महामानवांच्या प्रतिमांची विटंबना आणि एका युवकाच्या गंभीर जखमी होईपर्यंतचा थेट हल्ला केला.


पण या साऱ्या पार्श्वभूमीला कारण ठरले — चार वर्षांपासून बंद पडलेल्या सामाजिक मंडळाचा खोटा गवगवा आणि पदाधिकाऱ्यांचा लुटमारीचा नंगा नाच.


मंडळ बंद, पण भ्रष्टाचार अखंड!

भेदोडा येथील प्रज्ञाशील करुणा मंडळ हे मंडळ २६ डिसेंबर २०१७ रोजीच अधिकृतरीत्या बंद झाले होते. मात्र, ‘मंडळ बंद असतानाही’ काही स्वयंघोषित अपात्र पदाधिकाऱ्यांनी चार वर्षे अखंड लाखो रुपयांची उधळपट्टी व मनमानी कारभार सुरू ठेवला. Buddha Jayanti Violence कोणतीही ग्रामसभा, कोणताही लेखा-जोखा, कोणतेही समाजाचे संमतीपत्र नसताना हा अपप्रचार चालू राहिला. समाजाच्या नावावर निधी मिळवून, कार्यक्रम आयोजित करून, त्यातून लाखो रुपये लाटले गेले.


या प्रकारामुळे वैफल्यग्रस्त समाजबांधवांनी शेवटी राजुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली, आणि मा. ठाणेदार हिरडे साहेब यांनी या मंडळासंदर्भात चौकशी करून, “मंडळ रद्द झाले असून सध्याची कोणतीही समिती वैध नाही,” असा निर्वाळा दिला.


प्रशासनाचा आदेश — नवीन मंडळ स्थापन करा

ठाणेदाराच्या स्पष्ट आदेशानंतर समाजातील तीन प्रमुख व्यक्तींना बोलावून “गावातील नव्या निवडीद्वारे नविन समिती स्थापन करा” असा निर्णय १९ मे २०२५ रोजी घेण्यात आला. Buddha Jayanti Violence दि. २१ एप्रिल रोजी सहायक पोलीस अधिकारी मा. उरकुडे साहेब यांच्या उपस्थितीत जुन्या अपात्र मंडळाच्या सदस्यांकडून राजीनामे घेण्यात आले आणि नवीन मंडळ स्थापन करण्याच्या प्रक्रियेस अधिकृत मुहर लागली.


या निवडणुकीत गणेश लोखंडे या एम.ए. पदवीधारक व्यक्तीची बहुमताने निवड झाली. समाजात ही निवड स्वागतार्ह ठरत असतानाच काही समाजकंटकांनी पुन्हा वाद पेटवण्याचा घाट घातला.


वामन दुर्गे आणि त्याच्या टोळीचा कारस्थान

या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधात वामन दुर्गे या समाजकंटकाने उघडपणे विरोध दर्शवला. निवड झालेली व्यक्ती अयोग्य आहे, असा खोटा प्रचार करत त्याने आपल्या समर्थकांनाही भडकावले. Buddha Jayanti Violence विशेष म्हणजे, दारूच्या नशेत या टोळक्याने पोलिसांच्या समक्षच गोंधळ घातला आणि सभा गुंडाळण्यास भाग पाडले.


त्यानंतर या मंडळींनी समाजाच्या नकळत बुद्धविहारात रात्री दोन वाजता बुद्ध मूर्ती आणून एका कोपऱ्यात ठेवली. हे केवळ विहारात मूर्ती स्थापनेचा विषय नसून, समाजाच्या सामूहिक निर्णय प्रक्रियेवर गदा आणण्याचा प्रकार होता. Buddha Jayanti Violence या मूर्तीला विधिवत कार्यक्रम न घेता ८ तारखेला रात्री १ वाजता स्टेजवर ठेवण्यात आले, आणि सकाळी या प्रकाराची गावात चर्चा सुरु झाली. त्यातून नव्या वादाला तोंड फुटले.


समाधानाच्या प्रयत्नांना सुरुंग

गावात निर्माण झालेल्या तणावाला शांत करण्याचा प्रयत्न म्हणून गणपत रत्ने यांच्या मध्यस्थीने एक तात्पुरता निर्णय घेण्यात आला, की गंगाराम रत्ने हे प्रशासक म्हणून बुद्धजयंतीच्या दिवशी ध्वजारोहण करतील. परंतु, या ठरावालाही समाजकंटकांनी हरताळ फासला.


बुद्धजयंतीच्या दिवशी, ठरलेल्या वेळेनुसार झेंडा फडकवण्यासाठी विहाराच्या परिसरात समाज एकवटलेला असताना, दबा धरून बसलेल्या या समाजविघातकांनी शडयंत्रपूर्वक गंगाराम रत्ने यांच्याकडून नव्हे तर कवडू यादव सातपुते यांच्याकडून झेंडावंदन करण्याचा निर्णय लावून दिला.


ध्वजाऐवजी दगडफेक — प्रतिमांची विटंबना

ही नाट्यमय घडामोड चालू असतानाच, समाजकंटकांनी अचानक दगडफेक सुरू केली. Buddha Jayanti Violence विहार परिसरात उपस्थित असलेल्या सामान्य नागरिकांवर दगड, विटा फेकल्या गेल्या. इतकंच नव्हे तर, भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा असलेल्या खुर्च्या उचलून मारण्यात आल्या.


या हिंसाचारात त्या महामानवांच्या प्रतिमा खाली कोसळल्या व समाजकंटकांच्या पायाखाली चुरडल्या गेल्या. ही केवळ मारहाणीची घटना नव्हती, तर हे होते महामानवांच्या प्रतीकांवरील खुले हल्ले — समाजाच्या भावनांची विटंबना.


पोलिसांचा दुटप्पीपणा — गुन्हेगार सुटले, निरपराधांना चोप

या प्रकरणात अत्यंत गंभीर बाब म्हणजे, पोलिसांनी समाजकंटकांवर कारवाई करण्याऐवजी, काही निरपराध नागरिकांवरच बळाचा वापर केला. Buddha Jayanti Violence खुद्द उरकुडे साहेबांनी काही निरपराध व्यक्तींना अमानुषपणे मारहाण केली, तर समाजकंटकांचे नावे असलेले गुन्हेगार मोकाट फिरत राहिले.


या दगडफेकीत अंशुल लोखंडे याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले होते. तसेच इतर ५ ते ७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, राजुरा येथे उपचार सुरु आहेत.


गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकार — FIR नोंद

या सर्व प्रकारात राजुरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता कलम १९०, १८९(२), ११८(१), ११५(२), ३५२, १९१(२) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात मुख्य गुन्हेगार म्हणून खालील व्यक्तींची नावे नमूद आहेत:


आदित्य दुर्गे, शिलचंद दहागांवकर, वामन दुर्गे, दिवाकर दुर्गे, रमेश मून, शंकर झार्डे, गणेश दुर्गे, विश्वनाथ गोवर्धन, रमेश कांबळे, राजेश दहागांवकर, व्यकन्टी कांबळे, प्रतीक्षा झाडै, मंगला मून, सपना उद्रके, सुमन दुर्गे, रोशनी दुर्गे, सुरेश दहागावकर आणि इतर.


परंतु, अद्याप या आरोपींवर ठोस कारवाई झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही.


प्रशासन का गप्प? — थेट जबाबदारीची मागणी

या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण आहे. बुद्धजयंतीसारख्या शांतता आणि आत्मशक्तीच्या दिवसाला हिंसेचे गालबोट लागले. आणि याला जबाबदार कोण?

  • मंडळ बंद असूनही चार वर्षे मनमानी कारभार करणारे अपात्र पदाधिकारी
  • गुन्हेगारांना मोकळे सोडणारे पोलिस
  • समाजात वाद पेटवणारे समाजकंटक
  • उदासीन आणि दुर्लक्ष करणारे स्थानिक प्रशासन


१५ मे रोजी पत्रकार परिषदेत समाजबांधवांनी ठामपणे सांगितले की, प्रशासनाने जर दोषींवर तत्काळ कडक कारवाई केली नाही, तर बौद्ध समाज रस्त्यावर उतरेल. Buddha Jayanti Violence या साऱ्या प्रकाराला फक्त पोलिस तैनातीने आवर घालता येणार नाही, तर जबाबदारांना शिक्षा ही आवश्यक आहे.


शांततेच्या मार्गावर दगड टाकणाऱ्यांना शासनाचा खड्ग हवाच

भेदोडा गावातील ही घटना कोणत्याही एका समाजाची समस्या नाही, ती लोकशाहीच्या मुळावर घाव आहे. जिथे संघटनांचा कारभार पारदर्शक हवा, तिथे अपात्र मंडळी लाखो रुपयांची उधळपट्टी करत आहेत. Buddha Jayanti Violence जिथे समाजकंटक बुद्ध मूर्ती लपून ठेवत आहेत, तिथे कोणती शांती टिकणार? जिथे पोलिसच गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी निरपराधांवर डोळा टाकत आहेत, तिथे न्याय मिळणार कसा?


सरकार, प्रशासन, पोलिस यंत्रणा यांना याचा स्पष्ट संदेश हवा — “दोषींना माफ नाही. आणि समाज शांत बसेल, याची खात्री तुम्ही करून द्या.”


What triggered the violent incident in Bhedoda during Buddha Jayanti?
The violence was triggered by unauthorized individuals installing a Buddha idol without community consent, opposing legitimate leadership, and orchestrating chaos during the official flag-hoisting ceremony.
Who are the key accused in the Bhedoda violence?
The main accused include Waman Durge and his supporters, who allegedly instigated the crowd, assaulted people, and disrupted the event. FIRs have been filed against 20+ individuals under serious IPC sections.
What actions have police taken following the incident?
FIRs were registered at Rajura Police Station, but locals allege police brutality against innocent members while real culprits were spared. Reserved police forces have been deployed in the village.
What is the demand of the affected community after the attack?
The community demands strict legal action against the accused, protection of constitutional rights, and a full investigation into the financial fraud and illegal activities of the defunct mandal.


#Bhedoda #BuddhaJayanti #AmbedkariteMovement #SocialJustice #DalitRights #RajuraPolice #MandalCorruption #PoliceBrutality# FakeLeadership #AmbedkarJayanti #SCSTRights #BuddhistCommunity #GrassrootsVoices #MandalPolitics #PowerAbuse# CommunityConflict #PoliticalViolence #FakeMandalLeaders #BuddhaViolence #AmbedkarThought #SocialTerror# DalitVoices #JusticeForBhedoda #RajuraViolence #ChandrapurNews #GroundReport #IndianConstitution# CasteAtrocity #RightToDissent #CommunityRights #LocalCorruption #PoliceFailure #AttackOnDemocracy# UnlawfulAssembly #AmbedkarMission #MandalFraud #JusticeDelayed #SocialInjustice #PeaceDisturbed# ViolentClashes #ReligiousFreedom #RogueElements #FakeRepresentatives #DalitAtrocities #BhedodaCrisis# StopCasteViolence #BuddhismUnderAttack #HumanRightsIndia #GrassrootsMovement #DemandJustice #MaharashtraNews

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Ok, Go it!
To Top